Posts

Showing posts from August, 2019

On 10 August,2019 NSS Volunteers collected the fund for the flood relief people of Kolhapur

Image
Blog: http://cabtnssu.blogspot.com/ http://cabtrpsw.blogspot.com/ No. 678 Date: 10/08/2019 Rajmudra Pratishthan and NSS unit members took initiative and collected the help and donated in Chief Minister Relief Fund as a helping hand to the Kolhapur Flood affected people.

26July ,2019 कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम.

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम. लोणी (प्रतिनिधी): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंगोपन केले पाहिजे, वृक्षांमुळे शुद्ध हवा मिळते तसेच प्रदूषण रोखले जाते, आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी होते, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते अश्या विविध फायदे होतात म्हणून वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे वक्तव्य कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले.... वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही   प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे, कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतला हे खूप कौतुकास्पद आहे अशे मत राहता कृषि मंडळ अधिकारी श्री. नारायण लोळगे यांनी व्यक्त केले... मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने झालेला   निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून दिले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्षारोपण अभियानात सहभागी होऊन लोकनेते

On 26 July 2019 College of Agricultural biotechnology Loni And NSS Volunteers celebrated Kargil Vijay Diwas.

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस  Friday, July 26, 2019 कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा लोणी (प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगील युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली व विजयाची निशाणी म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.               या वेळी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कृषी शिक्षण संचालक डॉ.मधूकर खेतमाळस यांनी कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतिक आहे, कारगिलमध्ये सुमारे दोन महिने चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्याने कारगीलची शिखरं ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हकलून लावले होते व खरे पाहता हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतोय याचा अभिमान वाटतोय असे मत व्यक्त केले.तसेच स्वयंसेवक संचिता गवारे हीने आप